Wednesday, October 20, 2021

@वाटेगावच्या @श्रीवासुदेव मंदिरातील @दीपोत्सव… #कोजागिरी (आश्विन) #पौर्णिमा #कार्तिकपौर्णिमा असा महिनाभर असतो उपक्रम

@वाटेगावच्या @श्रीवासुदेव मंदिरातील @दीपोत्सव…



#कोजागिरी (आश्विन) #पौर्णिमा #कार्तिकपौर्णिमा असा महिनाभर असतो उपक्रम


@राजेंद्रकृष्ण_कापसे...


कोजागिरी पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा अशी महिनाभर भल्या पहाटे काकड आरती अनेक ठिकाणी चालू असते. परंतु सांगली जिल्हातील वाटेगाव येथील वाटेश्वर, विष्णू आणि वासुदेव मंदिरात महिनाभर दीपोत्सव सुरु असतो. या दीपोत्सवाची कार्तिक पौर्णिमे दिवशी यात्रेने सांगता होत आहे. त्या निमित्ताने… 



इंटरनेट स्पीड जाळे जरी फोफावत असले, तरी लोकांची देवाविषयी असणारी भक्ती जरा ही कमी झालेली नाही. दरवर्षी @देहु- @आळंदीहुन @पंढरपुरकडे जाणाऱ्याा @वारकऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. ती दरवर्षी वाढत आहे. गावोगावी अनेक मंदिरांचा @जीर्णोद्धार, मंदिरांची नवीन उभारणी वर्षभर सूर आहे.

तसेच अनेक मंदिरात वर्षभर विविध धार्मिक उपक्रम सुरु असतात. यामुळे भक्तगण सतत भक्ती रसात न्हाहत असतो. असाच महिनाभर चालणारा आणखी एक भक्ति सोहळा म्हणजे @काकडआरती सोहळा सध्या राज्यभर सुरु आहे. हा काकड आरती सोहळा @कोजागिरी @आश्विनपौर्णिमा कार्तिकपौर्णिमेच्या दरम्यान प्रामुख्याने सुरु असतो. भल्या पहाटे गुलाबी व बोचऱ्या थंडीत चालणारा हा सोहळा...




भक्तीचीया पोटी बोधकाकडा ज्योति । 

पंचप्राण जीवें भावें ओवाळू आरती ।। 

ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा । 

दोन्ही कर जोडोनी चरणी ठेवीन माथा ।।

असे श्रीहरीचे मुख्यकमल पाहत काकड आरती सुरु होते.

 


दरम्यान याच महिन्याभराच्या काळात सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथील @भोगावती नदी तीरावरील श्रीवासुदेव दीपोत्सव सुरु होतो. या दरम्यान, @श्रीवाटेश्वर व @श्रीविष्णू मंदीरात विविध धार्मिक उपक्रम असतात. संपुर्ण भारतात श्री वासुदेव मंदिरांपैकी वाटेगाव येथील मंदीर व मूर्ती प्रसिद्ध, मोठी व सुंदर आहे.


सुमारे अडीचशे- तीनशे वर्षापूर्वी वाटेश्वर बल्लाळ @दिवेकर यांनी वाटेगाव येथील शिल्पकाराकडून श्रीवासुदेवाची मूर्ती तयार करुन घेतली. यावेळी आणखी दोन मूर्ती त्या मूर्तीकाराने तयार केल्या. सांगली जिल्ह्यातील @भिलवडी व @शेटफळ (तासगाव) येथे त्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. त्याचबरोबर वाटेगाव येथील मूर्तीची प्रतिष्ठापना वाटेश्वर दिवेकर यांनी केली. मंदिरात तशीच एकमूर्ती @पंचधातूंची असून @श्रीमतभगवदगीतेत ध्यानाला कसे बसावे. ही सांगणारी श्रीची मूर्ती चतुर्भुज असुन उभी आहे. श्री मूर्तीच्या हातात शंख, चक्र, गदा, पद्म अशी शस्त्रे आहेत.


मंडित चतुर्भुज दिव्य काना कुंडले ।

श्री मुखाची शोभा पाहता तेज फांकले ।।

वैजयंती माळ गळा शोभे श्रीमंत ।

शंख चक्र, गदा, पद्म आयुधे शोभत ।।


श्रींची मूर्ती पाहताच असे भागवती काव्य मुखातून नकळत निघते. माथा श्रींचरणी धाव घेतो. श्रींच्या मूर्ती प्रतिष्ठापनेनंतर वाटेश्वर बल्लाळ दिवेकर यांनी मंदिरासमोरील मोकळ्या जागेत जिवंत समाधी घेतली. वाई येथील @विश्वनाथदादा @पाटणकर हे तीर्थयात्रा करीत असताना ते @बद्री @केदारनाथला गेले असताना त्यांच्या मनात निजधामाला (स्वर्गी) जाण्याचा विचार. या वेळी श्रीवासुदेवाने त्यांना दुष्टांत दिला. अजून आपले कार्य संपले नाही. तुम्ही परत जा. असा ढुष्टांत होताच ते परत गावी आले. वाटेगावी मंदिरात आले असताना समाधी हलु लागली. असा चमत्कार त्यांना दिसु लागला. त्यावेळी दिवेकर घराण्यातील सर्वजण अज्ञान अवस्थेत असल्याने ते वाटेगावीच राहिले. मंदिराची व समाधीची देखभाल पाहु लागले.



शके १७६७मध्ये त्यांनी मंदिरासमिर सभामंडप बांधला. तसेच प्रभावळ व सिंहासन सोने पितळ्याचे केले. दिवेकर घराणे सज्ञान होताच ते वाईला परतले व कालांतराने ते महानिर्वाण झाले. श्रींच्या प्रतिष्ठपने पासुनच मंदिरात दीपोत्सव सुरु आहे. याचबरोबर मुर्ती स्थापनेचा वाढदिवस फाल्गुन नवमी ते द्वादशी असा दोन तीन दिवसांचा उत्सव असतो. दीपोत्सवात अश्विन अमावस्येला (लक्ष्मीपुजनादिवशी) गोवर्धन पर्वत बोटावर उचलुन भक्तांचे वारा व पावसापासुन रक्षण केले.त्यागोवर्धन पर्वताची पुजा त्या दिवशी केली जाते.



दुपारी बारा वाजता लाह्या व गुळाच्या पाकाचा डोंगर केला जातो. यावर श्रीवासुदेवाची मुर्ती ठेवुन तिची पुजा अर्चा करुन नैवद्य दाखविला जातो. संपुर्ण मंदिरात झेंडुच्या फुलांची आरास केलेली असते. रात्री श्रींची पालखी रथातुन निघते. दीपोत्सवकाळात मंदिराचा सभामंडप, गाभारा, मंदिराच्या अवती- भवती पणत्या, टांगत्या समया, रंगमाळा, कमानी कंदील, पणत्याचे झाड, यातील दीपप्रज्वलीत करण्यात येतात. यावेळी वीजेचे दिवे बंद करण्यात येतात. यावेळी सर्वमंदिर दिव्यांनी उजाळुन निघालेले असते. हा आगळा-वेगळा क्षण नयनात साठवुन ठेवण्यासाठी अनेकजण दुरवरुन येतात.


सहस्त्रदीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा।

उजळल्या दशदिशा गगना आलीसे शोभा ।।

काकड आरती माझ्या कृष्ण सभागिया।

चराचर मोहरलें तुझी मुर्ती पहावया ।।

असे काकड आरतीचे अभंगाप्रमाणे या दीपोत्सवाची रंगत वाढवितात. या दीपोत्सवासाठी रोज सुमारे तीन किलोपेक्षा जास्त गोडे तेल लागते. मंदिर पुर्णपणे खासगी असल्याने मंदिरास कोणताही इनाम नाही. काही वर्षापुर्वी @कुरुंदवाड सरकारने या देवस्थानच्या नावे दैनंदिनी दिवा बत्तीसाठी ५६ रुपये ३१ पैसे ट्रेझरीत ठेवले आहेत. मंदिर उत्तराभिमुख असुन दिवेकरांची समाधी पुर्वाभिमुख आहे. दिवेकर हे मुळचे @गुहागर जवळील वाडे- पाडेगाव येथील होय. वाटेगाव येथे त्यांची पाचवी पिढी आहे. काकड आरती, शेजआरती, दास हरिपाठ, भजन महानैवद्य, आरती एकनाथी भागवत ज्ञानेश्वरी आदी ग्रंथाचे पारायण बाराही महिने सुरू असते.


ग्रामदैवत श्रीवाटेश्वराची पार्श्वभुमी अशी की,

@संतश्रेष्ठ @ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात @श्रीचांगदेव महाराज भोगावती तीरी वास्तव्यास होते. यावेळी त्यांना स्वयंभू शिवलिंग सापडले. त्याकाळा पासुन या @शिवलिंगास @काशीतीर्थ मानले जाते. शिवलिंग व मंदिर पुरातन आहे. नदी व मंदिराच्या घाटामध्ये दगडीघाट आहे. या मंदिर व घाटावर सर्व जाती- धर्माचे लोक येऊन दिवे पाजळवितात. नदीच्या पाण्यात मंदिराचे प्रतिबिंब सुरेख दिसते. येथील पुजा- आर्चा गुरव परिवार हे करतात.


महिनाभराच्या दीपोत्सवा दरम्यान श्री वाटेश्वराची तीन वेळा यात्रा भरते. दिवाळीच्या पाडव्याला (बलिप्रतिपदेला) पहिली यात्रा भरते. यावेळी श्रींची पुजा करण्याचा मान @मुळीक घराण्याला असतो. वैकुठ चतुर्दशीला (त्रिपुरारी पौणिमेच्या आदल्या दिवशी) दुसरी यात्रा भरते. यादिवशी शिव व विष्णु भेट असते. शिव व विष्णुस बेल व तुळशी अपर्ण करण्यात येतात. या यात्रेचा मान @नलवडे- पाटील या घराण्याला असतो.

शेवटची व तिसरी यात्रा त्रिपुरारी पौणिमेला असते. यादिवशी श्रीवासुदेव व श्रीवाटेश्वर मंदिरातील दीपोत्सवाची सांगता होते. ही यात्रा @चव्हाण पाटील यांची असते. तर त्या दिवशी यात्रा निघण्यापूर्वी श्रीवाटेश्वराची पुजा करण्याचा @कापसे पाटील घराण्याला असतो. यात्रेच्या पुजेला शिवलिंगावर महाअभिषेक होती.


या यात्रेकाळात गावातील सर्व समाज बांधवाना विविध श्रीवाटेश्वराची सेवा करण्याचा मान असतो. आज हि सर्व समाज बांधव तो मान आंनदाने करतात. संध्याकाळी पुजा अर्चा झाल्यानंतर श्रींची पालखी निघते.






श्रीविष्णु, श्रीविठ्ठल, श्रीवासुदेव मंदिरातुन पालखी काही वेळ नदी किनारी विसावते. यावेळी भक्तगण औट (शोभेच्या दारूची) आतिषबाजी करतात. ही आतिषबाजी दोन- तीन तास सुरु असते. त्यानंतर पालखीपुढे मार्गस्थ होते. यावेळी गावातील लेकी सुना शंभु कैलासाचा पतीला ओवाळतात.

कैलासींचा देवभोळा चक्रवर्ती।

ग्राम स्त्रीया ओवाळती पार्वतीचा पती।।



पालखी बाजारपेठेत आल्यानंतर दांडपट्टा, लेझिम शौर्य कसरतीचे खेळ होतात. धनगरांच्या ओव्या होतात. त्यानंतर पालखी धर्मनाथ (दत्त), मारुती मंदिरामार्गे पहाटे राऊळात येते. मंदिराची तटबंदी, घाट, बुरुज, पुलावर दिवे लावुन दीपोत्सवाची सांगता होते. दुसऱ्या दिवशी तमाशा- करमणुकीचे कार्यक्रम होतात. तर दुपारी कुस्त्यांचा आखड्याने यात्रेची सांगता होते.




  • @राजेंद्रकृष्ण_कापसे 

----------------------



Monday, July 8, 2019

सिंहगडावर उतरले पावसाळी ढग; पर्यटकांची वाढली गर्दी

'तुम्हाला ढगात फिरायचे असेल तर लांब कुठे जाण्याची गरज नाही. सध्या पावसाळा सुरू झाल्याने सिंहगडावर पावसाळी ढग खाली येत असून त्यातून चालण्याचा वेगळा अनुभव आपणास येथे मिळत आहे.

मागील आठवड्याच्या सुरवातीला पावसाने पुन्हा दडी मारली होती. शुक्रवार पासून पुन्हा पावसाला सुरवात झाल्याने शनिवार रविवारी सुट्टीच्या दिवशी पूर्ण पावसाळी वातावरण झाले आणि पर्यटकांचा जथ्थे येत होते.

घाट रस्त्यात कोंढणपूर फाट्याजवळ थांबले की, गडाला ढगांचा वेढा पडतो. ढगात गड हरवून जातो. मग पावसाची सर येते. काही वेळ ती बरसत राहते. मग काही वेळाने वारा वाहतो. गडालगतचे ढग पुढे जातात आणि गड पुन्हा दिसू लागतो. पाऊस पडून ऊन पडले की, सूर्यप्रकाशात गड चमकू लागतो. जणू काही गड पावसाच्या सरीने धूऊन काढल्याचे दिसते.

गडावर गेल्यावर पार्किंग मधून वर जाताना डाव्याबाजूला।डोंगराच्या दगडावर अनेक वनस्पती दगडाला चिकटून उगवत आहेत. पावसाच्या सरीचे पाणी खडकातून टिपकत असते.

पायऱ्या चढताना गार वारा लागतो काही वेळा तो भिंती आड दडून बसतो. पावसाळ्यात गड चढताना दम कमी लागतो. उन्हाळ्यात मात्र तीन दरवाजे चढताना दमवितो. हिरव्यागार लहान लहान रोपे वाऱ्यावर डुलून आपले स्वागत करीत असतात. लहान पक्षी पावसात भिजलेले अंग झाडून कामाला लागतात. तर पाया खाली लाल रंगाच्या आळी तिला अनेक पाय असलेल्या पैसा नावाचे गटाने जमिनीत ये- जा करत असतात. गडावरील झाडाचे शेंडे ढगात हरवून जातात.

गडावरील मंदिर, स्मारके भिजल्याने ती मूळ रूप आणि काळ्या रंगात दिसल्याने सुंदर दिसतात. गडावरील टाक्यांमध्ये पाणी साठायला सुरवात झाली आहे. गडाच्या गस्तीच्या वाटेने भटकताना पावसाची रूपे पहावयास मिळतात. गडाच्या मागील बाजूस असलेल्या तानाजी कडा कडे गेले की, वारा- ढग गडाच्या तटाला धडकून वर जाताना दिसतात. शेजारी हवा पॉईटला वारा जोराचा असतो. अशी एक दिवसाची पावसातील भटकंती झाली की, भूक लागलेली असते.

देव टाक्याचे पाणी त्या पाण्यातील कांदा भजी, बेसन भाकरी, वांग्याचे भरीत आणि दही हे मात्र भूक भरून काढतात.
पावसाच्या सरी,  गार वारा आणि हिरवागार निसर्ग सोबतीला आहे.

मोसमी पावसाला उशिरा सुरुवात झाल्याने यंदा सिंहगडावरील पर्यटकांची गर्दी देखील उशिरा सुरू झाली. मागील आठवड्यात पावसाला सुरुवात झाल्याने  यंदाच्या मोसमातील पहिल्या शनिवार- रविवारी सुमारे वीस हजाराहून अधिक पर्यटकांनी सिंहगडास भेट दिली होती.

Thursday, July 17, 2014

जर्नालिस्ट वेलफेअर स्कीम लवकरच,

प्रकाश जावडेकरांच्या घोषणेचे

परिषद आणि पुणे जिल्हा पत्रकार संघातर्फे स्वागत



पत्रकारांसाठी जर्नालिस्ट वेलफेअर स्कीम आणण्याची तसेच पत्रकार संरक्षण कायदा कऱण्याच्यादृष्टीने पत्रकारांवरील हल्ल्याची नोंद एनसीआरबी मार्फत ठेवण्याची घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल लोकसभेत केली आहे.मराठी पत्रकार परिषद तसेच पुणे जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने या घोषणांचे स्वागत कऱण्यात आले असून प्रकाश जावडेकर यांचे आभारही मानण्यात आले आहेत.

महाराष्ट्रासह देशभरात सर्वत्र पत्रकारांवर सातत्यानं हल्ले होत आहेत.या विरोधात पत्रकार संरक्षण कायदा करण्याची मागणी सर्वप्रथम मराठी पत्रकार परिषदेने 2005 मध्ये केली होती.त्यानंतर एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार हल्लाविरोधी कृती समिती स्थापन झाली आणि या समितीने त्याचा सातत्यनं पाठपुरावा केला.मात्र महाराष्ट्र सरकारने केवळ कोरड्या आश्वासनाशिवाय काहीच केेले नाही.या पार्श्वभूमीवर 15 जून रोजी पुण्यात पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि पुणे जिल्हा पत्रकार संघाने एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जावडेकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.त्यावेळी आपण पत्रकार पेन्शन योजना आणि पत्रकार संरक्षण कायदा करणार असल्याचे जावडेकर यांनी घोषित केले होते.

त्यानंतर बुधवारी जावडेकर यांनी देशातील पत्रकारांसाठी जर्नालिस्ट वेलफेअऱ स्कीम आणि पत्रकार संरक्षण कायदा करण्यासाठी नोंदी ठेवण्याची घोषणा केली.या दोन्ही घोषणा पत्रकार हिताच्या असल्याने मराठी पत्रकार परिषद आणि पुणे जिल्हा पत्रकार संघ या घोषणांचे स्वागत करीत आहे यासंबंधिचा कायदा लवकरात लवकर करण्यात यावा अशी मागणी मराठी पत्रकार परिषद तसेच पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या संयुक्त पत्रकात कऱण्यात आली आहे.या पत्रकावर परिषदचे अध्यक्ष किरण नाईक, माजी अध्यक्ष एस.एम.देशमुख, कार्याध्यक्ष चंद्रशेखर बेहेर, सरचिटणीस संतोष पवार, उपाध्यक्ष सुभाष भारव्दाज, कोषाध्यक्ष सिध्दार्थ शर्मा कार्यालयीन सचीव श्रीराम कुमठेकरतसेच पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद पाबळे, पुणे शहर अध्यक्ष राजेंद्रकृष्ण कापसे, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय सुर्वे, कार्याध्यक्ष बापूसाहेब गोरे, सुनील वाळूंज दत्तात्रेय जोरकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Tuesday, September 24, 2013

हिरवाईने नटला सिंहगड - - सकाळ वृत्तसेवा मंगळवार, 24 सप्टेंबर 2013

खडकवासला - सिंहगडाच्या डोंगररांगा चार महिन्यांपासून हिरव्यागर्द झाल्या असून, येथील फूल वनस्पती बहरल्या आहेत.


खडकवासला - सिंहगडाच्या डोंगररांगा चार महिन्यांपासून हिरव्यागर्द झाल्या असून, येथील फूल वनस्पती बहरल्या आहेत. कासच्या पठारावरचा अनुभव सध्या पर्यटकांना येत आहे. तेरडा, सोनकी व कारवी या वनस्पती गडावर आहेत.


""कारवीची झाडे प्रामुख्याने डोंगराच्या उतारावर आहेत. घाट रस्त्याच्या शेवटच्या टप्प्यात कारवीची झाडे आहेत. त्याची फुले एका वेळी येत नाहीत. तेरड्याप्रमाणे त्यांची झालर दिसत नाही,'' असे वनस्पतीतज्ज्ञ डॉ. सचिन पुणेकर यांनी सांगितले. खरपुडी व तिच्या विविध जातीही गडावर आढळतात, असेही त्यांनी सांगितले.






कास पठार व सिंहगड एकाच रांगेतील प्रदेश आहेत. दोन्ही ठिकाणच्या अनेक वनस्पतींमध्ये साम्य आहे; परंतु सिंहगड परिसरात पठार व वनस्पतींची संख्या तुलनेने कमी आहे, असे उपवनसंरक्षक राजेंद्र कदम यांनी सांगितले. ते म्हणाले, ""तेरडा, सोनकी व कारवी खरपुडी बरोबर हळुंदा, भारंगी, चिरे आमरी, दिंडा, कडू कारंदा, कचोरा, रान आले, काटे कोरांटी, कौला (बारका), कावळी, खोबरदोडा, रान फावटा, फापड, रानजीरे, कारवी, सोनकी, निचुर्डी, बोंदारा, शतावरी, म्हाळुंग, पांढरी मुसळी व काळी मुसळी अशी फुले आढळतात.''

Sunday, September 8, 2013

जिल्हाध्यक्षपदी पाबळे, तर शहराध्यक्षपदी कापसे


पुणे जिल्हा, शहर मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारणीची निवडणूक बिनविरोध


शहराध्यक्षपदी राजेंद्रकृष्ण कापसे


पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस. एम. देशमुख



पुणे शहर मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारणी



शहराध्यक्ष राजेंद्रकृष्ण कापसे




जिल्हाध्यक्ष शरद पाबळे

पुणे 8 : पुणे मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि पुणे शहर मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारणीची निवडणूक शनिवारी बिनविरोध पार पडली. जिल्हाध्यक्ष म्हणून शरद पाबळे यांची तर शहराध्यक्षपदी राजेंद्रकृष्ण कापसे यांची वर्णी लागली आहे. पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस. एम. देशमुख, परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष भारव्दाज, विभागीय सचिव डी.के. वळसे-पाटील, व पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष अध्यक्ष बाळासाहेब ढसाळ, यांच्या उपस्थितीत ही निवडणूक झाली. श्रीराम कुमठेकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

जिल्हा कार्यकारणी-

जिल्हा कार्याध्यक्ष बापूसाहेब गोरे, सचिवपदी राजेंद्र सांडभोर, कोषाध्यक्षपदी रमेश जाधव यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी डॉ. विजयकुमार भिसे, दत्तात्रय सुर्वे, प्रविण कदम, ज्ञानेश्वर मिडगुले, धनंजय थोरात, सुनिल वाळुंज, रामदास जगताप, सुजाता गुरव, सहचिटणीस एम. जी. शेलार, दत्ता म्हसकर, महिला प्रतिनिधी दिपाली मदन काळे, कार्यकारणी सदस्य मधुकर गायकवाड, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तालुका निमंत्रक सुभाष शेटे, मराठी पत्रकार परिषद कार्यकारणी सदस्य प्रा. दत्ता कारंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

शहर कार्यकारणी-

निलेश कांकरिया, सचिव सुशांत सोनोने, अपाध्यक्ष अमोल साबळे, मंदार कदम, विवेकानंद काटमोरे, रूपाली अवचरे, कोषाध्यक्ष मेघा शिंपी, सहचिटणीस सागर जगताप यांची बिनविरोध निवड झाली.

मतभेद बाजूला ठेवा-
शहर आणि ग्रामिण कार्यकारणीला मार्गदर्शन करताना पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम. देशमुख म्हणाले "आपसातील व्यक्तीगत, संघटनात्मक मतभेद बाजूला ठेवा. राज्यातील सर्व पत्रकारानी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या झेंड्याखाली एकत्र यावे. आक्रमक पवित्रा घेतल्याशिवाय राज्य सरकार पत्रकारांच्या प्रश्नांची दखल घेणार नाही."



40 photo on my facebook
https://www.facebook.com/RAJENDRAKRUSHNA/posts/652342608118534?notif_t=like


Tuesday, July 30, 2013

सिंहगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

सिंहगड ref wikipidiya कल्याण दरवाजा पुण्याच्या नैर्‌ऋत्येला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. दोन पायऱ्यासारखा दिसणारा खंदकाचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तो ध्यानी येतो. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलुख या गडावरून दिसतो इतिहास[संपादन] सिंहगड किल्ल्याचे प्रवेशद्वार याचे आधीचे नाव कोंडाणा. पूर्वी हा किल्ला आदिलशाहीत होता. दादोजी कोंडदेव हे आदिलशहाकडून सुभेदार म्हणून नेमले होते. पुढे इ.स. १६४७ मध्ये गडावर आपले लष्करी केंद्र बनवले. पुढे इ.स. १६४९ मध्ये शहाजी राजांच्या यांच्या सुटकेसाठी शिवाजी राजांनी हा किल्ला परत आदिलशहाला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये कोंडाणापण होता. मोगलांतर्फे उदेभान राठोड हा कोंडाण्यावरचा अधिकारी होता. हा मूळचा राजपूत पण नंतर मुसलमान झाला होता.. "पुणे दरवाजा" सिंहगडचे मूळ नाव कोंढाणा होते आणि शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी(मावळ प्रांतातून भरती झालेल्या सैनिकांनी) हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला. या लढाईत तानाजींना वीरमरण आले आणि प्राणाचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी "गड आला पण सिंह गेला" हे वाक्य उच्चारले. पुढे त्यांनी गडाचे कोंडाणा हे नाव बदलून सिंहगड असे ठेवले. सिंहगड हा मुख्यतः तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे प्रसिद्ध आहे. पहा सिंहगडाची लढाई आजचा सिंहगड या युद्धाबाबत सभासद बखरीत खालीलप्रमाणे उल्लेख आहे. तानाजी मालुसरा म्हणून हजारी मवळियांचा होता. त्याने कबूल केले की, 'कोंडाणा आपण घेतो', असे कबूल करून वस्त्रे, विडे घेऊन गडाचे यत्नास ५०० माणूस घेऊन गडाखाली गेला. आणि दोघे मावळे बरे, मर्दाने निवडून रात्री गडाच्या कड्यावरून चढवले. गडावर उदेभान रजपूत होता. त्यास कळले की, गनिमाचे लोक आले. ही खबर कळून कुल रजपूत कंबरकस्ता होऊन, हाती तोहा बार घेऊन, हिलाल (मशाल), चंद्रज्योती लावून बाराशे माणूस तोफाची व तिरंदाज, बरचीवाले, चालोन आले. तेव्हा मावळे लोकांनी फौजेवर रजपुतांचे चालून घेतले. मोठे युद्ध एक प्रहर झाले. पाचशे रजपूत ठार जाले. उदेभान किल्लेदार खाशा त्याशी व तानाजी मालुसरा यांशी गाठ पडली. दोघे मोठे योद्धे, महशूर, एक एकावर पडले. तानाजीचे डाव्या हाताची ढाल तुटली. दुसरी ढाल समयास आली नाही. मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करून त्याजवर वोढ घेऊन, दोघे महरागास पेटले. दोघे ठार झाले. मग सूर्याजी मालुसरा (तानाजीचा भाऊ), याने हिंमत धरून, कुल लोक सावरून उरले राजपूत मारिले. किल्ला काबीज केला. शिवाजी महाराजांना गड जिंकल्याची पण तानाजी पडल्याची बातमी मिळाली तेव्हा ते म्हणाले, 'गड आला, पण सिंह गेला'. माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ च्या रात्री हे युद्ध झाले. सिंहगडावरील माहितीफालकानुसार[संपादन] सिंहगडाचे मूळचे नाव कोंढाणा, इसामी नावाच्या कवीने फुतुह्स्सलातीन किंवा शाहनामा-इ-हिंद या फार्शी काव्यात (इ. १३५०) मुछ्म्द तुघलकाने इ.१६२८ मध्ये कुंधीयाना किल्ला घेतल्याची माहिती येते. त्यावेळेस हा किल्ला नागनायक नावाच्या कोळ्याच्या ताब्यात होता. अहमदनगरच्या निजामशाही कारकिर्दीतील कोंढाण्याचे उल्लेख इ.१४८२, १५५३, १५५४ व १५६९ च्या सुमारसचे आहेत. इ.१६३५ च्या सुमारास कोंढाण्यावर सीडी अवर किल्लेदार असताना मोगल व आदिलशाह यांनी मिळून कोंढाणा घेतला. यावेळेस (इ.१६३६) आदिलशाहचा खजिना डोणज्याच्या खिंडीत निजामाचा सरदार मुधाजी मायदे याने लुटला. शहाजी राज्यांच्या काळात सुभेदार दादोजी कोंडदेव मालवणकर यांच्या ताब्यात कोंढाणा असल्याचा उल्लेख आदिलशाही फर्मानात आहे. दादोजी कोंडदेव आदिलशाहीचे नोकर असले तरी ते शहाजी राजांशी एकनिष्ठ असल्याने शिवाजी राजांनी त्यांच्या मृत्यूपर्यंत (इ.१६४७) कोंढाणा घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यानंतर लगेचच हा गड राजांनी ताब्यात घेतला. इतिहासकार श्री.ग.ह.खरे यांच्या मते तानाजी प्रसंग घडण्यापूर्वीच कोंढाण्याचे नाव 'सिंहगड' झाल्याचे कागदोपत्री पुरावे आहेत. कै.ह.ना.आपटे यांच्या कादंबरीतील उल्लेखामुळे लोकांची समजूत झाली की तानाजी प्रसंगानंतर या किल्ल्याचे नाव सिंहगड झाले. शिवाजी राजांच्या काळात व त्यानंतर हा किल्ला कधी मराठ्यांकडे तर कधी मोगलांकडे ताब्यात होता. गडावरील ठिकाणे[संपादन] दारूचे कोठार : दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे जी दगडी इमारत दिसते तेच दारू कोठार. दि. ११ सप्टेंबर १७५१ मध्ये या कोठारावर वीज पडली. ह्या अपघातात गडावरील त्यावेळच्या फडणिसांचे घर उध्वस्त होऊन घरातील सर्व माणसे मरण पावली. टिळक बंगला : रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेवरच्या ह्या बंगल्यात बाळ गंगाधर टिळक येत असत. १९१५ साली महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांची भेट याच बंगल्यात झाली. कोंढाणेश्वर : हे मंदिर शंकराचे असून ते यादवांचे कुलदैवत होते. आत एक पिंडी व सांब असणारे हे मंदिर यादवकालीन आहे. श्री अमृतेश्वर भैरव मंदिर' : कोंढाणेश्वराच्या मंदिरावरून थोडे पुढे गेले की डावीकडे हे अमृतेश्वराचे प्राचीन मंदिर लागते. भैरव हे कोळ्यांचे दैवत आहे. यादवांच्या आधी ह्या गडावर कोळ्यांची वस्ती होती. मंदिरात भैरव व भैरवी अशा दोन मूर्ती दिसतात. भैरवाच्या हातात राक्षसाचे मुंडके आहे. देवटाके : तानाजी स्मारकाच्या मागून डाव्या हाताच्या छोटा तलावाच्या बाजूने डावीकडे गेल्यावर हे प्रसिद्ध असे देवटाके लागते. या टाक्याचा उपयोग पिण्याचे पाणी म्हणून होत असे व आजही होतो. महात्मा गांधी जेव्हा पुण्यास येत तेव्हा मुद्दाम ह्या टाक्याचे पाणी मागवत असत. कल्याण दरवाजा : गडाच्या पश्चिमेस हा दरवाजा आहे. कोंढणपूरवरून पायथ्याच्या कल्याण गावातून वर आल्यास ह्या दरवाजातून आपला प्रवेश होतो. हे एकामागोमाग असे दोन दरवाजे आहेत. यापैकी वरच्या दरवाज्याच्या दोन्हीकडील बुरुजांच्या भिंतीत अर्धवट बाहेर आलेला हत्ती व माहूत अशी दगडी शिल्पे होती. श्रीशालिवाहन शके १६७२ कारकीर्द श्रीमंत बाळाजी बाजीराव पंडित प्रधान असा शिलालेख आढळतो. उदेभानाचे स्मारक : दरवाजाच्या मागच्या बाजूस वर असलेल्या टेकडीवर यावे. येथे जो चौकोनी दगड आहे तेच उदेभान राठोडचे स्मारकचिन्ह म्हणून ओळखले जाते. मोगलांतर्फे उदेभान हा सिंहगडचा अधिकारी होता. झुंजारबुरूज : झुंजारबुरूज हे सिंहगडचे दक्षिण टोक होय. उदयभानूच्या स्मारकापुढून समोरची टेकडी उतरून या बुरुजावर येता येते. येथून समोरच टोपीसारखा राजगड, त्याच्याच उजवीकडे तोरणा हे गड दिसतात तर खाली पानशेतचे खोरे दिसते. पूर्वेकडे लांबवर पुरंदर दिसतो. डोणगिरीचा उर्फ तानाजी कडा : झुंजारबुरूजावरून मागे येऊन तटाच्या भिंतीच्या बाजूने पायवाटेने तानाजीच्या कडाकडे जाता येते. हा कडा गडाच्या पश्चिमेस आहे.येथूनच तानाजी मावळ्यांसह वर चढला. राजाराम स्मारक : राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळासारखी जी घुमटी दिसते तीच छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी. मोगली फौजेला सतत ११ वर्षे टक्कर देणार्‍या राजाराम महाराजांचे वयाच्या अवघ्या ३०व्या वर्षी शनिवार दि.२ मार्चइ.स.१७०० या दिवशी सिंहगडावर निधन झाले. पेशव्यांतर्फे या स्मारकाची उत्तम व्यवस्था ठेवली जायची. तानाजीचे स्मारक : अमृतेश्वराच्या मागच्या बाजूने वर गेल्यावर डाव्या बाजूस सुप्रसिद्ध तानाजीचे स्मारक दिसते. ‘तानाजी स्मारक समितीच्या’ वतीने हे बांधण्यात आले आहे. माघ व नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ या दिवशी झालेल्या लढाईत तानाजी मारला गेला. दरवर्षी माघ नवमीस येथे मंडळातर्फे तानाजीचा स्मृतिदिन साजरा केला जातो. गडावर जाण्याच्या वाटा[संपादन] सिंहगड हा किल्ला पुण्यापासून २० किलोमीटर अंतरावर आहे. स्वारगेट बसस्थानकापासून सारसबाग किंवा नेहरू क्रीडांगणाकडून जाणारा ह्या रस्त्याने सिंहगड अंदाजे ३५ कि.मी.वर आहे. मार्ग स्वारगेट - आनंदनगर - वडगांव - खडकवासला - सिंहगड पायथा. स्वारगेट पासून ५० ते ५६ क्रमांकाच्या बस या मार्गावर धावतात. शिवाय, सहा आसनी किंवा खासगी वाहनाने सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. ज्यांना गडावर चालत जायचे नसेल त्यांच्यासाठी पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी खासगी वाहने साधारण दर ३०-६० मिनिटांनी मिळतात.