Tuesday, September 24, 2013

हिरवाईने नटला सिंहगड - - सकाळ वृत्तसेवा मंगळवार, 24 सप्टेंबर 2013

खडकवासला - सिंहगडाच्या डोंगररांगा चार महिन्यांपासून हिरव्यागर्द झाल्या असून, येथील फूल वनस्पती बहरल्या आहेत.


खडकवासला - सिंहगडाच्या डोंगररांगा चार महिन्यांपासून हिरव्यागर्द झाल्या असून, येथील फूल वनस्पती बहरल्या आहेत. कासच्या पठारावरचा अनुभव सध्या पर्यटकांना येत आहे. तेरडा, सोनकी व कारवी या वनस्पती गडावर आहेत.


""कारवीची झाडे प्रामुख्याने डोंगराच्या उतारावर आहेत. घाट रस्त्याच्या शेवटच्या टप्प्यात कारवीची झाडे आहेत. त्याची फुले एका वेळी येत नाहीत. तेरड्याप्रमाणे त्यांची झालर दिसत नाही,'' असे वनस्पतीतज्ज्ञ डॉ. सचिन पुणेकर यांनी सांगितले. खरपुडी व तिच्या विविध जातीही गडावर आढळतात, असेही त्यांनी सांगितले.






कास पठार व सिंहगड एकाच रांगेतील प्रदेश आहेत. दोन्ही ठिकाणच्या अनेक वनस्पतींमध्ये साम्य आहे; परंतु सिंहगड परिसरात पठार व वनस्पतींची संख्या तुलनेने कमी आहे, असे उपवनसंरक्षक राजेंद्र कदम यांनी सांगितले. ते म्हणाले, ""तेरडा, सोनकी व कारवी खरपुडी बरोबर हळुंदा, भारंगी, चिरे आमरी, दिंडा, कडू कारंदा, कचोरा, रान आले, काटे कोरांटी, कौला (बारका), कावळी, खोबरदोडा, रान फावटा, फापड, रानजीरे, कारवी, सोनकी, निचुर्डी, बोंदारा, शतावरी, म्हाळुंग, पांढरी मुसळी व काळी मुसळी अशी फुले आढळतात.''

Sunday, September 8, 2013

जिल्हाध्यक्षपदी पाबळे, तर शहराध्यक्षपदी कापसे


पुणे जिल्हा, शहर मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारणीची निवडणूक बिनविरोध


शहराध्यक्षपदी राजेंद्रकृष्ण कापसे


पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस. एम. देशमुख



पुणे शहर मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारणी



शहराध्यक्ष राजेंद्रकृष्ण कापसे




जिल्हाध्यक्ष शरद पाबळे

पुणे 8 : पुणे मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि पुणे शहर मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारणीची निवडणूक शनिवारी बिनविरोध पार पडली. जिल्हाध्यक्ष म्हणून शरद पाबळे यांची तर शहराध्यक्षपदी राजेंद्रकृष्ण कापसे यांची वर्णी लागली आहे. पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस. एम. देशमुख, परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष भारव्दाज, विभागीय सचिव डी.के. वळसे-पाटील, व पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष अध्यक्ष बाळासाहेब ढसाळ, यांच्या उपस्थितीत ही निवडणूक झाली. श्रीराम कुमठेकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

जिल्हा कार्यकारणी-

जिल्हा कार्याध्यक्ष बापूसाहेब गोरे, सचिवपदी राजेंद्र सांडभोर, कोषाध्यक्षपदी रमेश जाधव यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी डॉ. विजयकुमार भिसे, दत्तात्रय सुर्वे, प्रविण कदम, ज्ञानेश्वर मिडगुले, धनंजय थोरात, सुनिल वाळुंज, रामदास जगताप, सुजाता गुरव, सहचिटणीस एम. जी. शेलार, दत्ता म्हसकर, महिला प्रतिनिधी दिपाली मदन काळे, कार्यकारणी सदस्य मधुकर गायकवाड, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तालुका निमंत्रक सुभाष शेटे, मराठी पत्रकार परिषद कार्यकारणी सदस्य प्रा. दत्ता कारंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

शहर कार्यकारणी-

निलेश कांकरिया, सचिव सुशांत सोनोने, अपाध्यक्ष अमोल साबळे, मंदार कदम, विवेकानंद काटमोरे, रूपाली अवचरे, कोषाध्यक्ष मेघा शिंपी, सहचिटणीस सागर जगताप यांची बिनविरोध निवड झाली.

मतभेद बाजूला ठेवा-
शहर आणि ग्रामिण कार्यकारणीला मार्गदर्शन करताना पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम. देशमुख म्हणाले "आपसातील व्यक्तीगत, संघटनात्मक मतभेद बाजूला ठेवा. राज्यातील सर्व पत्रकारानी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या झेंड्याखाली एकत्र यावे. आक्रमक पवित्रा घेतल्याशिवाय राज्य सरकार पत्रकारांच्या प्रश्नांची दखल घेणार नाही."



40 photo on my facebook
https://www.facebook.com/RAJENDRAKRUSHNA/posts/652342608118534?notif_t=like


Tuesday, July 30, 2013

सिंहगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

सिंहगड ref wikipidiya कल्याण दरवाजा पुण्याच्या नैर्‌ऋत्येला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. दोन पायऱ्यासारखा दिसणारा खंदकाचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तो ध्यानी येतो. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलुख या गडावरून दिसतो इतिहास[संपादन] सिंहगड किल्ल्याचे प्रवेशद्वार याचे आधीचे नाव कोंडाणा. पूर्वी हा किल्ला आदिलशाहीत होता. दादोजी कोंडदेव हे आदिलशहाकडून सुभेदार म्हणून नेमले होते. पुढे इ.स. १६४७ मध्ये गडावर आपले लष्करी केंद्र बनवले. पुढे इ.स. १६४९ मध्ये शहाजी राजांच्या यांच्या सुटकेसाठी शिवाजी राजांनी हा किल्ला परत आदिलशहाला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये कोंडाणापण होता. मोगलांतर्फे उदेभान राठोड हा कोंडाण्यावरचा अधिकारी होता. हा मूळचा राजपूत पण नंतर मुसलमान झाला होता.. "पुणे दरवाजा" सिंहगडचे मूळ नाव कोंढाणा होते आणि शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी(मावळ प्रांतातून भरती झालेल्या सैनिकांनी) हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला. या लढाईत तानाजींना वीरमरण आले आणि प्राणाचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी "गड आला पण सिंह गेला" हे वाक्य उच्चारले. पुढे त्यांनी गडाचे कोंडाणा हे नाव बदलून सिंहगड असे ठेवले. सिंहगड हा मुख्यतः तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे प्रसिद्ध आहे. पहा सिंहगडाची लढाई आजचा सिंहगड या युद्धाबाबत सभासद बखरीत खालीलप्रमाणे उल्लेख आहे. तानाजी मालुसरा म्हणून हजारी मवळियांचा होता. त्याने कबूल केले की, 'कोंडाणा आपण घेतो', असे कबूल करून वस्त्रे, विडे घेऊन गडाचे यत्नास ५०० माणूस घेऊन गडाखाली गेला. आणि दोघे मावळे बरे, मर्दाने निवडून रात्री गडाच्या कड्यावरून चढवले. गडावर उदेभान रजपूत होता. त्यास कळले की, गनिमाचे लोक आले. ही खबर कळून कुल रजपूत कंबरकस्ता होऊन, हाती तोहा बार घेऊन, हिलाल (मशाल), चंद्रज्योती लावून बाराशे माणूस तोफाची व तिरंदाज, बरचीवाले, चालोन आले. तेव्हा मावळे लोकांनी फौजेवर रजपुतांचे चालून घेतले. मोठे युद्ध एक प्रहर झाले. पाचशे रजपूत ठार जाले. उदेभान किल्लेदार खाशा त्याशी व तानाजी मालुसरा यांशी गाठ पडली. दोघे मोठे योद्धे, महशूर, एक एकावर पडले. तानाजीचे डाव्या हाताची ढाल तुटली. दुसरी ढाल समयास आली नाही. मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करून त्याजवर वोढ घेऊन, दोघे महरागास पेटले. दोघे ठार झाले. मग सूर्याजी मालुसरा (तानाजीचा भाऊ), याने हिंमत धरून, कुल लोक सावरून उरले राजपूत मारिले. किल्ला काबीज केला. शिवाजी महाराजांना गड जिंकल्याची पण तानाजी पडल्याची बातमी मिळाली तेव्हा ते म्हणाले, 'गड आला, पण सिंह गेला'. माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ च्या रात्री हे युद्ध झाले. सिंहगडावरील माहितीफालकानुसार[संपादन] सिंहगडाचे मूळचे नाव कोंढाणा, इसामी नावाच्या कवीने फुतुह्स्सलातीन किंवा शाहनामा-इ-हिंद या फार्शी काव्यात (इ. १३५०) मुछ्म्द तुघलकाने इ.१६२८ मध्ये कुंधीयाना किल्ला घेतल्याची माहिती येते. त्यावेळेस हा किल्ला नागनायक नावाच्या कोळ्याच्या ताब्यात होता. अहमदनगरच्या निजामशाही कारकिर्दीतील कोंढाण्याचे उल्लेख इ.१४८२, १५५३, १५५४ व १५६९ च्या सुमारसचे आहेत. इ.१६३५ च्या सुमारास कोंढाण्यावर सीडी अवर किल्लेदार असताना मोगल व आदिलशाह यांनी मिळून कोंढाणा घेतला. यावेळेस (इ.१६३६) आदिलशाहचा खजिना डोणज्याच्या खिंडीत निजामाचा सरदार मुधाजी मायदे याने लुटला. शहाजी राज्यांच्या काळात सुभेदार दादोजी कोंडदेव मालवणकर यांच्या ताब्यात कोंढाणा असल्याचा उल्लेख आदिलशाही फर्मानात आहे. दादोजी कोंडदेव आदिलशाहीचे नोकर असले तरी ते शहाजी राजांशी एकनिष्ठ असल्याने शिवाजी राजांनी त्यांच्या मृत्यूपर्यंत (इ.१६४७) कोंढाणा घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यानंतर लगेचच हा गड राजांनी ताब्यात घेतला. इतिहासकार श्री.ग.ह.खरे यांच्या मते तानाजी प्रसंग घडण्यापूर्वीच कोंढाण्याचे नाव 'सिंहगड' झाल्याचे कागदोपत्री पुरावे आहेत. कै.ह.ना.आपटे यांच्या कादंबरीतील उल्लेखामुळे लोकांची समजूत झाली की तानाजी प्रसंगानंतर या किल्ल्याचे नाव सिंहगड झाले. शिवाजी राजांच्या काळात व त्यानंतर हा किल्ला कधी मराठ्यांकडे तर कधी मोगलांकडे ताब्यात होता. गडावरील ठिकाणे[संपादन] दारूचे कोठार : दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे जी दगडी इमारत दिसते तेच दारू कोठार. दि. ११ सप्टेंबर १७५१ मध्ये या कोठारावर वीज पडली. ह्या अपघातात गडावरील त्यावेळच्या फडणिसांचे घर उध्वस्त होऊन घरातील सर्व माणसे मरण पावली. टिळक बंगला : रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेवरच्या ह्या बंगल्यात बाळ गंगाधर टिळक येत असत. १९१५ साली महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांची भेट याच बंगल्यात झाली. कोंढाणेश्वर : हे मंदिर शंकराचे असून ते यादवांचे कुलदैवत होते. आत एक पिंडी व सांब असणारे हे मंदिर यादवकालीन आहे. श्री अमृतेश्वर भैरव मंदिर' : कोंढाणेश्वराच्या मंदिरावरून थोडे पुढे गेले की डावीकडे हे अमृतेश्वराचे प्राचीन मंदिर लागते. भैरव हे कोळ्यांचे दैवत आहे. यादवांच्या आधी ह्या गडावर कोळ्यांची वस्ती होती. मंदिरात भैरव व भैरवी अशा दोन मूर्ती दिसतात. भैरवाच्या हातात राक्षसाचे मुंडके आहे. देवटाके : तानाजी स्मारकाच्या मागून डाव्या हाताच्या छोटा तलावाच्या बाजूने डावीकडे गेल्यावर हे प्रसिद्ध असे देवटाके लागते. या टाक्याचा उपयोग पिण्याचे पाणी म्हणून होत असे व आजही होतो. महात्मा गांधी जेव्हा पुण्यास येत तेव्हा मुद्दाम ह्या टाक्याचे पाणी मागवत असत. कल्याण दरवाजा : गडाच्या पश्चिमेस हा दरवाजा आहे. कोंढणपूरवरून पायथ्याच्या कल्याण गावातून वर आल्यास ह्या दरवाजातून आपला प्रवेश होतो. हे एकामागोमाग असे दोन दरवाजे आहेत. यापैकी वरच्या दरवाज्याच्या दोन्हीकडील बुरुजांच्या भिंतीत अर्धवट बाहेर आलेला हत्ती व माहूत अशी दगडी शिल्पे होती. श्रीशालिवाहन शके १६७२ कारकीर्द श्रीमंत बाळाजी बाजीराव पंडित प्रधान असा शिलालेख आढळतो. उदेभानाचे स्मारक : दरवाजाच्या मागच्या बाजूस वर असलेल्या टेकडीवर यावे. येथे जो चौकोनी दगड आहे तेच उदेभान राठोडचे स्मारकचिन्ह म्हणून ओळखले जाते. मोगलांतर्फे उदेभान हा सिंहगडचा अधिकारी होता. झुंजारबुरूज : झुंजारबुरूज हे सिंहगडचे दक्षिण टोक होय. उदयभानूच्या स्मारकापुढून समोरची टेकडी उतरून या बुरुजावर येता येते. येथून समोरच टोपीसारखा राजगड, त्याच्याच उजवीकडे तोरणा हे गड दिसतात तर खाली पानशेतचे खोरे दिसते. पूर्वेकडे लांबवर पुरंदर दिसतो. डोणगिरीचा उर्फ तानाजी कडा : झुंजारबुरूजावरून मागे येऊन तटाच्या भिंतीच्या बाजूने पायवाटेने तानाजीच्या कडाकडे जाता येते. हा कडा गडाच्या पश्चिमेस आहे.येथूनच तानाजी मावळ्यांसह वर चढला. राजाराम स्मारक : राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळासारखी जी घुमटी दिसते तीच छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी. मोगली फौजेला सतत ११ वर्षे टक्कर देणार्‍या राजाराम महाराजांचे वयाच्या अवघ्या ३०व्या वर्षी शनिवार दि.२ मार्चइ.स.१७०० या दिवशी सिंहगडावर निधन झाले. पेशव्यांतर्फे या स्मारकाची उत्तम व्यवस्था ठेवली जायची. तानाजीचे स्मारक : अमृतेश्वराच्या मागच्या बाजूने वर गेल्यावर डाव्या बाजूस सुप्रसिद्ध तानाजीचे स्मारक दिसते. ‘तानाजी स्मारक समितीच्या’ वतीने हे बांधण्यात आले आहे. माघ व नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ या दिवशी झालेल्या लढाईत तानाजी मारला गेला. दरवर्षी माघ नवमीस येथे मंडळातर्फे तानाजीचा स्मृतिदिन साजरा केला जातो. गडावर जाण्याच्या वाटा[संपादन] सिंहगड हा किल्ला पुण्यापासून २० किलोमीटर अंतरावर आहे. स्वारगेट बसस्थानकापासून सारसबाग किंवा नेहरू क्रीडांगणाकडून जाणारा ह्या रस्त्याने सिंहगड अंदाजे ३५ कि.मी.वर आहे. मार्ग स्वारगेट - आनंदनगर - वडगांव - खडकवासला - सिंहगड पायथा. स्वारगेट पासून ५० ते ५६ क्रमांकाच्या बस या मार्गावर धावतात. शिवाय, सहा आसनी किंवा खासगी वाहनाने सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. ज्यांना गडावर चालत जायचे नसेल त्यांच्यासाठी पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी खासगी वाहने साधारण दर ३०-६० मिनिटांनी मिळतात.

Friday, May 10, 2013

पत्रकार संरक्षण कायद्याचे विधेयक येत्या कॅबिनेट समोर येणार-मुख्यमंत्री

पत्रकारांना संरक्षण देणाऱ्या कायद्याचे विधेयक येत्या कॅबिनेट समोर मांडण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सह्याद्रीवर पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या शिष्ट मंडळाशी बोलताना दिले.पत्रकार संरक्षण कायदा करावा व पत्रकारांसाठी पेन्शन योजना राबवावी या मागणीसाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने आज पनवेल ते वर्षा अशी कार रॅली काढण्यात आली होती.या रॅलीत ९० कार आणि २५० पत्रकार सहभागी झाले होते.पनवेल-वाशी-दादर मार्गे रॅली CST येथे आली असता गृहमंत्री आर.आर.पाटील रॅलीला सामोरे आले आणि त्यांनी पत्रकारांच्या मागण्या रास्त असून त्यांना संरक्षण मिळाले पाहिजे अशी भूमिका मांडली.यानंतर पोलिसांनी रॅलीला आझाद मैदानासमोर रोकले पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे शिष्टमंडळ नंतर मुख्यमंत्र्यांना भेटण्यास गेले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी येत्या कॅबिनेट समोर विधेयक आणण्याचे मान्य केले .तसेच अन्य राज्यातील पेन्शन योजनांचा अभ्यास करून महाराष्ट्रात पत्रकारांना पेन्शन योजना राबवण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले. एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वा खाली पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे शिष्ट मंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले. देशमुख यांच्या समवेत पुणे मराठी पत्रकार परिषदेचे सचिव किरण नाईक उपाध्यक्ष सुभाष भारद्द्वाज, शहर अध्यक्ष राजेंद्रकृष्ण कापसे जिल्हा अध्यक्ष शरद पाबळे उपस्थित होते

Monday, April 22, 2013

CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ SON RAJARAM MAHARAJ PUNYATITHI @ SINHGAD 4

https://www.youtube.com/watch?v=bj4NRDisd3A







शंभूछत्रपतींच्या मृत्युनंतर महाराष्ट्रात अशी परिस्थिती होती की - 'इथे राजा नाही, राजधानी नाही, तख्त सिंहासन नाही ! तरीदेखील महाराष्ट्र पुढची १८ वर्ष औरंगजेबाशी लढत राहिला) !'११ मार्च १६८९ रोजी औरंगजेबाने संभाजी महाराजांची अत्यंत क्रौर्याने हत्या केली. स्वराज्याने आपला राजा गमावला. मुघली सैन्याला जर आता रोखले नाही तर जे शंभूछत्रपतींचे झाले तसेच संपूर्ण स्वराज्याचे होईल, हे लोकांना पटले. 'स्वातंत्र्याची ज्योत' जी शिवाजी महाराजांनी पेटवली होती आणि जी मोगली वादळामुळे विझू लागली होती, तिला आता उलट 'वारा' मिळाला आणि 'ती' ज्योत भडकली. वणवा पेटला. घरटी एक एक तलवार बाहेर पडली. राजाराम महाराजांच्या प्रेरणेने रामचंद्रपंत बावडेकर अमात्य, सेनापती संताजी घोरपडे, धनाजी जाधव ह्यांनी मुघलांना दे माय धरणी ठाय करून सोडले. मुघली सैन्यातील घोडी तर पाणी प्यायला घाबरू लागली,( त्यांना पाण्यात देखील संताजी दिसत असे !) छत्रपती राजाराम यांनी १६९८ साली धनाजी जाधव,परसोजी भोसले आणि खंडेराव दाभाडे यांना घेऊन खानदेशची मोहिम आखली.या मोहिमेतच त्यांची तब्येत बिघडली.मोहिमेतून त्यांना सिंहगड किल्लावर नेण्यात आले तेथेच त्यांचे निधन झाले.छत्रपती राजाराम पराक्रमी,मुत्सद्दी होते.चांगल्या माणसांची त्यांना पारख होती.राजाराम यांना ताराबाईपासून शिवाजी तर राजसबाई पासून संभाजी हे दोन पुत्र झाले होते.

SINHGAD SINHGAD CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ SON RAJARAM MAHARAJ PUNYATITHI @ SINHGAD 4


https://www.youtube.com/watch?v=9HNW0eN_H88 शंभूछत्रपतींच्या मृत्युनंतर महाराष्ट्रात अशी परिस्थिती होती की - 'इथे राजा नाही, राजधानी नाही, तख्त सिंहासन नाही ! तरीदेखील महाराष्ट्र पुढची १८ वर्ष औरंगजेबाशी लढत राहिला) !'११ मार्च १६८९ रोजी औरंगजेबाने संभाजी महाराजांची अत्यंत क्रौर्याने हत्या केली. स्वराज्याने आपला राजा गमावला. मुघली सैन्याला जर आता रोखले नाही तर जे शंभूछत्रपतींचे झाले तसेच संपूर्ण स्वराज्याचे होईल, हे लोकांना पटले. 'स्वातंत्र्याची ज्योत' जी शिवाजी महाराजांनी पेटवली होती आणि जी मोगली वादळामुळे विझू लागली होती, तिला आता उलट 'वारा' मिळाला आणि 'ती' ज्योत भडकली. वणवा पेटला. घरटी एक एक तलवार बाहेर पडली. राजाराम महाराजांच्या प्रेरणेने रामचंद्रपंत बावडेकर अमात्य, सेनापती संताजी घोरपडे, धनाजी जाधव ह्यांनी मुघलांना दे माय धरणी ठाय करून सोडले. मुघली सैन्यातील घोडी तर पाणी प्यायला घाबरू लागली,( त्यांना पाण्यात देखील संताजी दिसत असे !) छत्रपती राजाराम यांनी १६९८ साली धनाजी जाधव,परसोजी भोसले आणि खंडेराव दाभाडे यांना घेऊन खानदेशची मोहिम आखली.या मोहिमेतच त्यांची तब्येत बिघडली.मोहिमेतून त्यांना सिंहगड किल्लावर नेण्यात आले तेथेच त्यांचे निधन झाले.छत्रपती राजाराम पराक्रमी,मुत्सद्दी होते.चांगल्या माणसांची त्यांना पारख होती.राजाराम यांना ताराबाईपासून शिवाजी तर राजसबाई पासून संभाजी हे दोन पुत्र झाले होते. https://www.youtube.com/watch?v=bj4NRDisd3A — at Sinhgad Fort. सिंहगड : छत्रपती राजाराम महाराज यांना ३१३ व्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले. इतिहास संशोधक व अभ्यासक पांडुरंग बलकवडे मार्गदर्शन करताना FALGUN NAVMI 4 APRIL 2013 https://www.youtube.com/watch?v=5c7Xzi7Ewbs

CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ SON RAJARAM MAHARAJ PUNYATITHI @ SINHGAD 4

<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br /></div> SINHGAD CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ SON RAJARAM MAHARAJ PUNYATITHI @ SINHGAD 4

https://www.youtube.com/watch?v=9HNW0eN_H88

शंभूछत्रपतींच्या मृत्युनंतर महाराष्ट्रात अशी परिस्थिती होती की - 'इथे राजा नाही, राजधानी नाही, तख्त सिंहासन नाही ! तरीदेखील महाराष्ट्र पुढची १८ वर्ष औरंगजेबाशी लढत राहिला) !'११ मार्च १६८९ रोजी औरंगजेबाने संभाजी महाराजांची अत्यंत क्रौर्याने हत्या केली. स्वराज्याने आपला राजा गमावला. मुघली सैन्याला जर आता रोखले नाही तर जे शंभूछत्रपतींचे झाले तसेच संपूर्ण स्वराज्याचे होईल, हे लोकांना पटले. 'स्वातंत्र्याची ज्योत' जी शिवाजी महाराजांनी पेटवली होती आणि जी मोगली वादळामुळे विझू लागली होती, तिला आता उलट 'वारा' मिळाला आणि 'ती' ज्योत भडकली. वणवा पेटला. घरटी एक एक तलवार बाहेर पडली. राजाराम महाराजांच्या प्रेरणेने रामचंद्रपंत बावडेकर अमात्य, सेनापती संताजी घोरपडे, धनाजी जाधव ह्यांनी मुघलांना दे माय धरणी ठाय करून सोडले. मुघली सैन्यातील घोडी तर पाणी प्यायला घाबरू लागली,( त्यांना पाण्यात देखील संताजी दिसत असे !) छत्रपती राजाराम यांनी १६९८ साली धनाजी जाधव,परसोजी भोसले आणि खंडेराव दाभाडे यांना घेऊन खानदेशची मोहिम आखली.या मोहिमेतच त्यांची तब्येत बिघडली.मोहिमेतून त्यांना सिंहगड किल्लावर नेण्यात आले तेथेच त्यांचे निधन झाले.छत्रपती राजाराम पराक्रमी,मुत्सद्दी होते.चांगल्या माणसांची त्यांना पारख होती.राजाराम यांना ताराबाईपासून शिवाजी तर राजसबाई पासून संभाजी हे दोन पुत्र झाले होते. https://www.youtube.com/watch?v=bj4NRDisd3A<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjr15zMpKhfpzT6el-eJp0vJBuMwu8ypeYDU21Ng3eAqMlnYOHd1k5ivS4mFyILQpqhMXDNH-kFWJ_RDnNderQEnFdcmaKBR4ot82hkN_Ajmj6Lcxx8pVSO9gv3OFjxyYTPfXK5I6oXF7g/s1600/1A.jpg" imageanchor="1" ><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjr15zMpKhfpzT6el-eJp0vJBuMwu8ypeYDU21Ng3eAqMlnYOHd1k5ivS4mFyILQpqhMXDNH-kFWJ_RDnNderQEnFdcmaKBR4ot82hkN_Ajmj6Lcxx8pVSO9gv3OFjxyYTPfXK5I6oXF7g/s320/1A.jpg" /></a><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjCrktPZ81DftHxNYee2xxN0A5C36vbPjSdLjE8DNh4igOCNjvH8tHibvQPqdiruKqaJL7t1lsBqBvXr2AfjuYGH1QCOUB7lStJnDnvUvkciaUOpa5M77763nDUFaAUP5R1eVJsZOIslh4/s1600/DSCN0435.JPG" imageanchor="1" ><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjCrktPZ81DftHxNYee2xxN0A5C36vbPjSdLjE8DNh4igOCNjvH8tHibvQPqdiruKqaJL7t1lsBqBvXr2AfjuYGH1QCOUB7lStJnDnvUvkciaUOpa5M77763nDUFaAUP5R1eVJsZOIslh4/s320/DSCN0435.JPG" /></a><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhtBni_0L0Ul-XQ-5yViLFqAW5GwFgPAibo9cPQwO2uaKW4ROFWiVvXFCziFHh0QnnnEf4Z1SkxdhFQcNlGpdKygf3zSUJolIV_qCh3xXXwOItFUyigH3v2GiU9w8VbLHQgsNAk3qQ_KOM/s1600/DSCN0460.JPG" imageanchor="1" ><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhtBni_0L0Ul-XQ-5yViLFqAW5GwFgPAibo9cPQwO2uaKW4ROFWiVvXFCziFHh0QnnnEf4Z1SkxdhFQcNlGpdKygf3zSUJolIV_qCh3xXXwOItFUyigH3v2GiU9w8VbLHQgsNAk3qQ_KOM/s320/DSCN0460.JPG" /></a><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj8L3vJEfryrGODxPVNI7UzAKScq6sJqFNaBdaXJ-fv3cbfvgvhwX5JQL_hYZb3NbeZGFMRjkp8R_DmiVPcRC0r9Dp3WQNotFmjTBcOb0h8x7Lc5oie1K6bB8kmUsuKkPqTDMgt0p8-hug/s1600/a1.jpg" imageanchor="1" ><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj8L3vJEfryrGODxPVNI7UzAKScq6sJqFNaBdaXJ-fv3cbfvgvhwX5JQL_hYZb3NbeZGFMRjkp8R_DmiVPcRC0r9Dp3WQNotFmjTBcOb0h8x7Lc5oie1K6bB8kmUsuKkPqTDMgt0p8-hug/s320/a1.jpg" /></a><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhpusN4cNUnZ6w2xbedLbp3kPdyEN2LkFd8jmOYkJEqoBk3PCVl5VQHS0Hw1Y7Nudh2r12fV8581Jo7Dk7nDQslFHesd2BCEc0TFfcvWUagi4JTVtwLbbporPwjZxiBYrYYrRbPpK87j3w/s1600/a2.jpg" imageanchor="1" ><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhpusN4cNUnZ6w2xbedLbp3kPdyEN2LkFd8jmOYkJEqoBk3PCVl5VQHS0Hw1Y7Nudh2r12fV8581Jo7Dk7nDQslFHesd2BCEc0TFfcvWUagi4JTVtwLbbporPwjZxiBYrYYrRbPpK87j3w/s320/a2.jpg" /></a><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgh4RNghQ2pT4CZPC8SlDZq2D2jxwKYa_yYfxjGbhk90FAhYgQ5BeXi96YCmBB6U9J_epQsu3wNQZEQ3V9vmJCGAh9ayoN9_BQUYnNF_7nma9bHYJi2ZK8AjGT9QczK-WNJyWmkk37-Up4/s1600/a3.jpg" imageanchor="1" ><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgh4RNghQ2pT4CZPC8SlDZq2D2jxwKYa_yYfxjGbhk90FAhYgQ5BeXi96YCmBB6U9J_epQsu3wNQZEQ3V9vmJCGAh9ayoN9_BQUYnNF_7nma9bHYJi2ZK8AjGT9QczK-WNJyWmkk37-Up4/s320/a3.jpg" /></a><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi5wbHandYFsvSqyv7j3-zL2D5tSY7AFQTN6iWh5utiLcZL4sTxrgdrzQaXYUDIYpZ8wAes9NDjviwWiHxOqSEZtlSptBuaAy-ttWV477KBEGuhpamNYo4AEIS6Kwi2E3dv7jm6miRbPGg/s1600/a4.jpg" imageanchor="1" ><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi5wbHandYFsvSqyv7j3-zL2D5tSY7AFQTN6iWh5utiLcZL4sTxrgdrzQaXYUDIYpZ8wAes9NDjviwWiHxOqSEZtlSptBuaAy-ttWV477KBEGuhpamNYo4AEIS6Kwi2E3dv7jm6miRbPGg/s320/a4.jpg" /></a>
— at Sinhgad Fort.  सिंहगड : छत्रपती राजाराम महाराज यांना ३१३ व्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले.
इतिहास संशोधक व अभ्यासक पांडुरंग बलकवडे मार्गदर्शन करताना FALGUN NAVMI 4 APRIL 2013
https://www.youtube.com/watch?v=5c7Xzi7Ewbs

सिंहगड : मराठी नववर्षानिमित्त सिंहगड पावित्र्य मोहिम SINHGAD FORT

सिंहगड : मराठी नववर्षानिमित्त सिंहगड पावित्र्य मोहिम SINHGAD FORT
https://www.youtube.com/watch?v=LHY022RH_-0

सिंहगड : श्री शके शालिवाहन 1935 मराठी नववर्षानिमित्त सिंहगड पावित्र्य मोहिमेच्या वतीने पुणे दरवाजा व नरवीर तानाजी मालुसरे यांचा समाधीसमोर गुढी उभारून स्वागत केले... 11 APRIL 2013 https://www.youtube.com/watch?v=bPsDOXLo0ik https://www.youtube.com/watch?v=LHY022RH_-0

Saturday, February 2, 2013

'योजना घेऊन येतो; जमिनी विकू नका... ' - सकाळ वृत्तसेवा..................... Saturday, February 02, 2013 AT 12:30 AM (IST) Tags: prabhakar deshmukh, pmc, farmer, pune खडकवासला - ""पानशेत परिसर ऐतिहासिक खोरे आहे. शेतकऱ्यांनो एकत्रित या. आम्ही तुमच्यापर्यंत शासनाच्या विविध योजना घेऊन येऊ, जमिनी विकू नका,'' असा सल्ला विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी येथील ग्रामस्थांना दिला.
शासनाच्या सुवर्ण जयंती राजस्व अभियान अंतर्गत पानशेत (ता. वेल्हे) येथे "शासन आपल्या दारी' या उपक्रमाचे आयोजन केले होते. त्या वेळी देशमुख बोलत होते. आमदार संग्राम थोपटे, अतिरिक्त जिल्हाधिकारी गणेश पाटील, प्रांताधिकारी संजय आसवले, सभापती नगिने, उपसभापती सविता वारघडे, वसुधा नलवडे, राजेश निवंगुणे, संतोष दसवडकर, सरपंच स्वाती गायकवाड, रेवणनाथ दारवटकर, भगवान पासलकर, तहसीलदार शिवाजीराव तळपे, गटविकास अधिकारी सुनील सोनवणे उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, ""या परिसरात डॉक्‍टर, शिक्षक वेळेवर पोचत नाही. त्यामुळे ग्राम आरोग्य संजिवनी योजनेला वेगळे निकष व अधिक प्राधान्य देणार आहे. आपली शाळा म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळेत लक्ष ठेवा. मुलांच्या संस्कार व शिक्षणाकडे आताच लक्ष द्या.''
थोपटे म्हणाले, ""आमच्या भागात धरणे आहेत; पण आम्हाला पाणी फक्त दिसते. ते आम्हाला शेतीला वापरता येत नाही. प्रत्येक वेळा संघर्ष करावा लागतो. धरण, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करू.''
या अभियानासाठी शासनाच्या सर्व विभागाच्या विविध योजनांचे स्टॉल येथे उभारले होते. प्रत्येकासाठी एक तरी योजना येथील प्रत्येक स्टॉलमध्ये आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तळपे यांनी केले.
वहिवाट करणाराच मालक सातबारा उताऱ्यावर सध्याच्या वारसाचे नाव येईल. अद्ययावत सातबाऱ्याचे चावडीवाचन केले जाईल. कुळकायद्यानुसार वहिवाट करणाराच मालक आहे. या परिसरात राबविलेल्या उपक्रमाबाबत मी फारसा समाधानी नाही, असे देशमुख यांनी सांगितले. =================