Monday, April 22, 2013

CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ SON RAJARAM MAHARAJ PUNYATITHI @ SINHGAD 4

https://www.youtube.com/watch?v=bj4NRDisd3A







शंभूछत्रपतींच्या मृत्युनंतर महाराष्ट्रात अशी परिस्थिती होती की - 'इथे राजा नाही, राजधानी नाही, तख्त सिंहासन नाही ! तरीदेखील महाराष्ट्र पुढची १८ वर्ष औरंगजेबाशी लढत राहिला) !'११ मार्च १६८९ रोजी औरंगजेबाने संभाजी महाराजांची अत्यंत क्रौर्याने हत्या केली. स्वराज्याने आपला राजा गमावला. मुघली सैन्याला जर आता रोखले नाही तर जे शंभूछत्रपतींचे झाले तसेच संपूर्ण स्वराज्याचे होईल, हे लोकांना पटले. 'स्वातंत्र्याची ज्योत' जी शिवाजी महाराजांनी पेटवली होती आणि जी मोगली वादळामुळे विझू लागली होती, तिला आता उलट 'वारा' मिळाला आणि 'ती' ज्योत भडकली. वणवा पेटला. घरटी एक एक तलवार बाहेर पडली. राजाराम महाराजांच्या प्रेरणेने रामचंद्रपंत बावडेकर अमात्य, सेनापती संताजी घोरपडे, धनाजी जाधव ह्यांनी मुघलांना दे माय धरणी ठाय करून सोडले. मुघली सैन्यातील घोडी तर पाणी प्यायला घाबरू लागली,( त्यांना पाण्यात देखील संताजी दिसत असे !) छत्रपती राजाराम यांनी १६९८ साली धनाजी जाधव,परसोजी भोसले आणि खंडेराव दाभाडे यांना घेऊन खानदेशची मोहिम आखली.या मोहिमेतच त्यांची तब्येत बिघडली.मोहिमेतून त्यांना सिंहगड किल्लावर नेण्यात आले तेथेच त्यांचे निधन झाले.छत्रपती राजाराम पराक्रमी,मुत्सद्दी होते.चांगल्या माणसांची त्यांना पारख होती.राजाराम यांना ताराबाईपासून शिवाजी तर राजसबाई पासून संभाजी हे दोन पुत्र झाले होते.

No comments:

Post a Comment